AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

Ajit Pawar : विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

| Updated on: Apr 18, 2025 | 11:10 AM
Share

Hindi Language Mandate Controversy : हिंदीच्या सक्तीचा मुद्दा तापलेला असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहताना सगळ्यांना मराठी आलंच पाहिजे असं त्यांनी म्हंटलं आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीपर्यंत आता इंग्रजी भाषेबरोबर हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाषेचा वाद सुरू झालेला आहे. विरोधकांकडून हिंदीच्या सक्तीवरून सत्ताधारी पक्षावर टीका केली जात आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरीचिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘सध्या कोणाला उद्योग नाही आहेत. विरोधकांना काही काम राहिलेलं नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल काहीही दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली आपली जीकाही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. बरीच वर्ष दिल्लीत पडून असलेला हा मुद्दा एनडीए सरकारने मार्गी लावला. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलंच पाहिजे. ज्यांना काहीही काम उरलेलं नाही ते लोक असा वाद घालत बसतात.

Published on: Apr 18, 2025 11:09 AM