जालन्यातून मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार? ‘वंचित’चा ‘मविआ’कडे प्रस्ताव काय?
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने महाविकास आघाडीसमोर मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवलाय. लोकसभेच्या जागावाटपाच्या जागेवरून मुंबईत महाविकास आघाडीची शेवटची बैठक झाली. यासोबतच वंचित आघाडीकडून एकूण ४८ पैकी २७ जागांची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला वंचितने प्रस्ताव दिलाय. ज्यामध्ये जरांगे पाटील यांना जालन्यातून महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून घोषित करा, अशी मागणी करण्यात आली. यासह २७ जागांची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने महाविकास आघाडीसमोर मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवलाय. लोकसभेच्या जागावाटपाच्या जागेवरून मुंबईत महाविकास आघाडीची शेवटची बैठक झाली. ज्यात मनोज जरांगे पाटलांना जालना लोकसभा मतदारसंघातून मविआकडून उमेदवारी जाहीर करा, असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यासोबतच वंचित आघाडीकडून एकूण ४८ पैकी २७ जागांची मागणी करण्यात आली आहे. तर मविआच्या उमेदवारांमध्ये १५ ओबीसी आणि ३ अल्पसंख्यांक असावेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, मराठ्यांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर माझ्या सोबत आहेत. मात्र सध्या माझ्या समोर मराठा आरक्षण हा मुद्दा आहे. राजकारण माझा अजेंडा नाही.
Published on: Feb 29, 2024 10:31 AM
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
