AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dr. Ravi Godse | भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही पण लसीकरण होणे महत्त्वाचे : रवि गोडसे

Dr. Ravi Godse | भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही पण लसीकरण होणे महत्त्वाचे : रवि गोडसे

| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 10:39 PM
Share

महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. सर्वांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती असताना, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही मात्र लसीकरण होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात आढळले तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. सर्वांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती असताना, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही मात्र लसीकरण होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले आहे.