AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा रडीचे डाव खेळण्याचा प्रकार! सदवार्तेंचा ठाकरे बंधूंना टोला

हा रडीचे डाव खेळण्याचा प्रकार! सदवार्तेंचा ठाकरे बंधूंना टोला

| Updated on: Oct 19, 2025 | 5:23 PM
Share

कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. निवडणूक आयोगावरील त्यांच्या आरोपांना "रडीचा डाव" असे संबोधत, ते राजकीयदृष्ट्या नापास झाल्याचे मत व्यक्त केले. राज ठाकरेंचे पूर्वीचे मुद्दे आणि अजित पवारांच्या मिमिक्रीवरही सदावर्तेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, हे दोन्ही भाऊ लवकरच गल्लीच्या राजकारणात क्लीन बोल्ड होतील.

कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. विरोधकांकडून निवडणूक आयोगावर करण्यात येत असलेल्या मतचोरीच्या आरोपांना सदावर्ते यांनी रडीचा डाव असे संबोधले. त्यांच्या मते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या नापास झाले असून, येत्या निवडणुकीत ते थनथन गोपाल ठरतील.

सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या पूर्वीच्या भूमिकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, भोंग्यांवरून बोलणारे राज ठाकरे आता शांत का आहेत? एल्फिन्स्टन पूल आणि टोलच्या मुद्द्यांवरून बोलणारे राज ठाकरे सध्या निष्क्रिय का आहेत? राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री केल्याबद्दलही त्यांनी टीका केली, ज्यात त्यांना टाळ्याही मिळाल्या नाहीत. सदावर्ते यांच्या मते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विधानसभा आणि लोकसभेच्या राजकारणातून आता गल्लीच्या राजकारणातही क्लीन बोल्ड होणार आहेत. निवडणुकीच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे राजकीय वैफल्य असल्याचे सदावर्ते यांनी नमूद केले.

Published on: Oct 19, 2025 05:23 PM