Kalyan-Dombivli | विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले; वेळेत पोहोचवणार परीक्षा केंद्रावर
कल्याण-डोंबिवली शहरात सध्या विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर १२ ट्रॅफिक बाईक रायडर्स तैनात करण्यात आले असून, हे रायडर्स विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढत परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचवणार आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरात सध्या विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर १२ ट्रॅफिक बाईक रायडर्स तैनात करण्यात आले असून, हे रायडर्स विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढत परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचवणार आहेत. ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष सेवा संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरात कार्यरत असणार आहे. परीक्षा काळात वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांनी कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.या सेवेसाठी 8286300300, 8286400400 आणि 7039003866 हे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले असून, या क्रमांकांवर कॉल करताच काही क्षणांत ट्रॅफिक रायडर्स घटनास्थळी पोहोचतील आणि विद्यार्थ्यांना मदत करतील.याबाबत माहिती देताना किरण बालवडकर, एसीपी (कल्याण वाहतूक शाखा) यांनी सांगितले की, परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणे आणि त्यांना मानसिक तणावापासून दूर ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी गरज भासल्यास दिलेल्या क्रमांकांवर निःसंकोच संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

