तक्रारीवरून राऊत भडकले, म्हणाले, सरकारविरोधात गुन्हा दाखव करा
शिंदे गटाने त्यांच्याविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून प्रश्न विचारले असता, त्यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. तसेच शिंदे गट आता भाजप झाला आहे. ते सारखी तक्रार करतात
मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच या दुर्घटनेत 50 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. यावरून शिंदे गटाने त्यांच्याविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून प्रश्न विचारले असता, त्यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. तसेच शिंदे गट आता भाजप झाला आहे. ते सारखी तक्रार करतात. तक्रार केली असेल तर करू द्या हे बीजेपीचे माणस आहेत, तक्रार करतात. त्यात नवीन काय? खारघरमध्ये जे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण? हिंमत असेल तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. मनात जरा जरी मानवता असेल सरकारविरोधात गुन्हा दाखल करा. आहे का हिंमत अशी विचारणा केली आहे.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

