कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
देशांतर्गत अतिरिक्त पुरवठ्यामुळे कांद्याचे बाजारभाव 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये. केंद्र सरकारने 1.9% निर्यात सबसिडी 50% ने कमी केल्याने निर्यातदार आणि शेतकरी संकटात आहेत. परदेशी बाजारपेठा गमावत असल्याने 10% सबसिडीची मागणी जोर धरत आहे.
लासळगाव, नाशिक: देशांतर्गत कांद्याचा अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याचे सरासरी बाजारभाव 800 ते 1 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये. या पार्श्वभूमीवर, कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केंद्राकडे 10 टक्के निर्यात सबसिडीची मागणी केली होती, जेणेकरून अधिक कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.
मात्र, केंद्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करत, अस्तित्वात असलेल्या १.९ टक्के सबसिडीमध्ये पन्नास टक्के कपात केली आहे. त्यामुळे ही सबसिडी आता प्रति शेकडा 0.95 पैशांपर्यंत खाली आली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशसारख्या प्रमुख बाजारपेठा स्वयंभू झाल्याने आणि पाकिस्तान तसेच चीनकडून अरब देशांना स्वस्त कांदा मिळत असल्याने भारतीय निर्यातदारांना परदेशी बाजारपेठा गमावण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून 10टक्के सबसिडी लागू करावी, अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात

