CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…
दिल्लीत जंतरमंतर येथे आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावेळी संसदेवर कुच करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. आता या लाठीमार आणि आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे.

नीट पेपर फुट प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीने आज संसदेवर मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर देशभरात विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी हे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
Neet paper leak प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उपोषण करणारे ज्येष्ठ पर्यावरण वादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रविवारी सकाळी पोलिसांनी जंतरमंतर वरुन उचलून नेले होते.त्यामुळे आजचे २० जुलैचा संसदेवरील मोर्चा होणार की नाही अशी सांशकता असताना आज दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने मोठा मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान मंत्री जे.पी.नड्डा यांना भेटण्यासाठी CJP चे शिष्ठमंडळ गेले होते. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसाचे उपोषण मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र,CJP ने नंतर संसदेवर मोर्चा काढला आणि त्यात पोलीस आणि आंदोलकात चकमक उडाली आणि पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले.
अण्णा हजारे काय म्हणाले ?
दिल्लीत जंतरमंतर येथे आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावेळी संसदेवर कुच करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. आता या लाठीमार आणि आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आजच्या दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की लाठीमार का झाला हे माहिती नाही. परंतू सर्व प्रश्न सलोख्याने सुटू शकतात असेही हजारे यांनी म्हटले आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
