Aurangabad Flood | मानवी साखळी करून विद्यार्थ्यांची सुटका, औरंगाबादेत रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुटका केली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांची सुटका केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते. मात्र गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला धाव घेतली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी करत गावकऱ्यांनी चिमुरड्या विद्यार्थ्यांची सुटका केली. गावकऱ्यांनीच अंगाचा थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन राबवल्याने कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

