AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Relief : बळीराजासाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा! मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब?

Farmer Relief : बळीराजासाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा! मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब?

| Updated on: Oct 07, 2025 | 10:27 AM
Share

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा अपेक्षित आहे. अतिवृष्टीमुळे बाधित ७२-७३ लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अधिक मदत मिळणार असून, बुजलेल्या विहिरींसाठीही मदतीचा प्रस्ताव आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी सुमारे १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असू शकते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे विशेष पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजअंतर्गत, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सुमारे ७२ ते ७३ लाख शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा प्रति हेक्टरी किमान दोन ते पाच हजार रुपये अधिक मदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा आहे. नुकसानीचे पंचनामे झालेल्या भागांमध्ये सरकार आर्थिक मदतीचे वाटप करेल आणि पुढील आठवड्यापासून मदतीचे वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. मदतीसाठी अतिवृष्टीचे निकष बदलण्याचाही प्रस्ताव आहे, ज्यात बुजलेल्या ११ हजार विहिरींनाही मदत दिली जाईल. शेतीसाठी मातीवर रॉयल्टी आकारली जाणार नाही आणि ओल्या दुष्काळाचे सर्व निकष लागू केले जातील. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन आणि विद्यार्थ्यांना शुल्कमाफी यांसारखे निर्णयही सरकार घेण्याची शक्यता आहे.

Published on: Oct 07, 2025 10:27 AM