Manoj Jarange Patil : अजित पवार अन् फडणवीसांविरोधात मोठा कट, जरांगेंच्या ‘त्या’ 2 सनसनाटी आरोपानं खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात, तर भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी अजित पवारांविरोधात कटकारस्थान रचल्याचा त्यांचा दावा आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आड राजकारण केले जात असल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर केले आहेत. जरांगे पाटील यांच्या मते, वडेट्टीवार हे ओबीसींच्या आरक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्यासोबत मिळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कटकारस्थान रचले आहे.
या कटकारस्थानाचा भाग म्हणून १० तारखेला नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्याची गुप्त बैठक झाल्याचा दावाही जरांगे यांनी केला. हा मोर्चा म्हणजे ओबीसींचा नसून काँग्रेसचा आहे आणि मराठा आरक्षण मिळू नये यासाठी तो काढला जात असल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी परळीचे घराणे (मुंडे कुटुंब) देखील भुजबळांच्या या षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करणाऱ्या भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या भूमिकेच्या विरोधात जरांगे यांनी हे आरोप केले आहेत.
Published on: Oct 06, 2025 10:10 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
