Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची मिळू शकते संधी सरकारला घाम फुटणार?
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसत असून, या निवडणुकीत महायुतीकडून मोठा राजकीय डाव टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसत असून, या निवडणुकीत महायुतीकडून मोठा राजकीय डाव टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या पारड्यातील काही जागा खेचून आणण्याचाही प्रयत्न होऊ शकतो.
दरम्यान, उद्धव ठाकरे मैदानात उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्यास महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे, तर काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
जर निवडणूक चुरशीची झाली, तर महाविकास आघाडीतील मतविभाजनाचा फायदा महायुतीला होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ

