विजयकुमार घाडगेंचा खून करायचा प्रयत्न होता; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
लातूरच्या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विजयकुमार घाडगेंची भेट घेतली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विजयकुमार घाडगेंची भेट घेतली आहे. लातूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी भेटीनंतर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, बहुतेक आम्हाला अशी शंका आहे की हा हल्ला तटकरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच घडवून आणलाय. हा तटकरे साहेबांनी सांगून घडवून आणलेला हल्ला आहे. म्हणजे किती मराठा द्वेष आहे यांच्यात यातूनही दिसून आलं आहे. विजय घाडगे यांना जीवे मारण्याचाच उद्देश या मारहाणीचा होता, असा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला आहे.
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..

