AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्ग रखडवण्यामागचं नेमकं ‘अर्थकारण’

| Updated on: Aug 27, 2023 | 10:43 PM
Share

Raj Thackeray On Mumbai Goa Highway Kolad | मुंबई-गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. या मागे षडयंत्र असल्याचा संशय राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

कोलाड | मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन मनसे चांगलीच आक्रमक झाली. राज ठाकरे यांची पनवेलमध्ये काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या मुद्द्यावरुन सभा पार पडली. त्यानंतर मनसैनिकांनी कोकण पट्ट्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड केली. यावरुन राजकारणही तापलं. त्यानंतर खळखट्ट्याक झाल्यानंतर मनसेने गांधीगिरीची वाट चोखाळली. महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामावरुन मनसेने कोकण जागर यात्रा काढली.

पळस्पे फाटा ते खारपाडा दरम्यान कोकण जागर यात्रा काढली. मनसेच्या या जागर यात्रेत अनेक नेते सहभागी झाले. अमित ठाकरे यांनी यात्रेचं नेतृत्व केलं. मनसेच्या या जागर यात्रेत कोकणातील असंख्य नागरिक सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात कोकणकरांनी हजेरी लावल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोलाडमध्ये झालेल्या सभेत सर्वांचे आभार मानले. इतकंच नाही, तर राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष या महामार्गाचं काम का रखडलंय याचं कारण सांगत मोठा दावा केलाय.

राज ठाकरे काय म्हणाले?

“ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या.पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या.  हे सर्व आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“तसेच कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी जमीनी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केलं.

Published on: Aug 27, 2023 10:43 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार