AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात, भाजपच्या पराभवाचे पाढेच वाचले

Raj Thackeray : बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात, भाजपच्या पराभवाचे पाढेच वाचले

| Updated on: Jan 09, 2026 | 1:25 PM
Share

राज ठाकरे यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची जोरदार मागणी केली आहे. देशात निवडणूक आयोग अस्तित्वात नसल्याचा आरोप करत त्यांनी तेलंगणा आणि पंजाबमधील बॅलेट पेपर निवडणुकांचे दाखले दिले. तर, उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर मराठी मतं फोडण्यासाठी मिंधे गटाचा वापर करत असल्याचा आणि अजित पवार-भाजप यांच्यातील नुरा कुस्तीचा गंभीर आरोप केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. तेलंगणा आणि पंजाबमधील जिल्हा परिषद निवडणुकांचा दाखला देत, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई आणि ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मिंधे गटाला शिवसेना आणि चिन्ह याच कारणासाठी दिले गेले, जेणेकरून मराठी मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करून त्यांना फोडता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, अजित पवार आणि भाजप यांच्यात नुरा कुस्ती (आपसात ठरवून लढलेली लढत) सुरू असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. विरोधकांना कोणतीही जागा न ठेवता, एकमेकांवर आरोप करून नंतर एकत्र येण्याचे हे राजकारण असल्याची टीका त्यांनी केली.

Published on: Jan 09, 2026 12:52 PM