PM Narendra Modi : दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
Modi Warns Pakistan In Mann Ki Baat : पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली गेली आहेत. त्यानंतर आज मन की बात कार्यक्रमात मोदींनी पाकला थेट इशारा दिला आहे.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, असा इशारा मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय देणार असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. दहशतवादी हल्ल्यातील दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलं आहे, अशी मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितल. काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांवर हल्लाबोल करताना त्यांना थेट इशारा दिला आहे. पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली गेली आहेत. त्यानंतर आज मन की बात कार्यक्रमात मोदींनी पाकला थेट इशारा दिला आहे.
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
