AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : 27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : 27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Apr 30, 2025 | 11:30 AM
Share

संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरून आज पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ज्या गृहखात्यावर आहे त्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. पण तसं करण्याची सरकारची तयारी नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आज भाजप सरकारला पहलगाम हल्ल्यावरून धारेवर धरलं. हे 27 बळी म्हणजे सरकारने घेतलेले नरबळी आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी बोलताना राऊत यांनी केला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, पहलगामचा मानवी संहार हा सरकारच्या गफीलपणामुळे झालेला आहे. सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहून विरोधक काय बोलतात हे ऐकायची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. मात्र त्यांनी आपला बिहारचा पूर्व नियोजित दौरा रद्द नाही केला, हल्ला झाल्यानंतर सर्वात अधि गृह खात्यावर करवाई व्हायला हवी होती. पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घेतला पाहिजे असंही राऊत यांनी म्हंटलं.

Published on: Apr 30, 2025 11:30 AM