ट्रिपल इंजिन सरकारचा लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार, कुणाची नावं चर्चेत? कुणाची खाती बदलणार?
राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरू होत आहे. बहुप्रतिक्षीत तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळात तिनही पक्षाकडून कोणाची वर्णी लागेल? कुणाचा पत्ता कट होईल? यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जातायंत.
राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरू होत आहे. त्यापूर्वीच बहुप्रतिक्षीत तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळात तिनही पक्षाकडून कोणाची वर्णी लागेल? कुणाचा पत्ता कट होईल? यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जातायंत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतून भाजपचे नेते गणेश नाईक, कणकवलीतून नितेश राणे, पर्वती येथील माधुरी मिसाळ, सातारा येथून शिवेंद्र राजे भोसले, मुंबईतून अतुल भातखळकर आणि तुळजापुरातून राणा पाटील, निलंगा येथून संभाजी निलंगेकर, सुरेश धस यांच्याही नावं चर्चेत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, आशिष जैस्वाल, भरत गोगावले यांची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवार यांच्याकडून संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावं चर्चेत आहेत. तर कोणत्या नेते, मंत्री यांची खाती बदलली जावू शकतात बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 17, 2024 11:19 AM
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
