AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग! दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

| Updated on: Sep 08, 2025 | 9:50 AM
Share

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 97% भरले असून, तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि दूतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पोलिसांनी नदीकाठाला जवळ जाण्यापासून परावृत्त केले आहे. नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सध्या तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून, दूतोंड्या मारुती परिसरात पाणी कमरेपर्यंत पोहोचले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पावसाचा काहीसा ओसरला असला तरी, ढगाळ हवामान कायम आहे. पोलिस प्रशासन नागरिकांना आणि भाविकांना नदीच्या काठावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर धरणे देखील मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत. नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published on: Sep 08, 2025 09:50 AM