AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेंग्विनचा 15  कोटींचा ठेका कुणासाठी? नितेश राणेंचा मुंबईच्या महापौरांना सवाल

पेंग्विनचा 15 कोटींचा ठेका कुणासाठी? नितेश राणेंचा मुंबईच्या महापौरांना सवाल

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 12:53 PM
Share

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे. वाघ हा आपल्या वातावरणात राहू शकतो, मात्र, पेंग्विन आपल्या वातावरणात राहू शकत नाही, त्यासाठी देखभालीची गरज असते, किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
बालहट्टासाठी मुंबईकरांची फसवणूक का करता हा माझा मूळ प्रश्न आहे. पेंग्विन राणीच्या बागेत आणल्यानंतर पर्यटन वाढलय का, तर त्याचं उत्तर नाही, असं मुंबई महापालिकेचे आकडे सांगतात. राणीच्या बागेचं तिकीट 5 रुपयांवरुन ते 50 रुपयांवर नेलं आहे. मुंबईकरांनी राणीच्या बागेकडे पाठ फिरवली आहे. पेंग्विनसाठी 15 कोटींचं टेंडर का काढलंय याचं उत्तर द्या, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तर, नितेश राणेंच्या पत्राचा आदर करते, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.