AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं

OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं

| Updated on: Sep 02, 2026 | 2:28 PM
Share

ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून मंत्री भुजबळ, राठोड, गुलाबराव पाटील यांनी बहिष्कार टाकला. ओबीसी महामंडळासाठी निधीची तरतूद नसल्याचा आणि वस्तीगृहे, शिष्यवृत्तींसाठी पुरेसा बजेट नसण्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या मंत्र्यांच्या भूमिकेचे कौतुक केले असून, जोपर्यंत असे मंत्री आवाज उचलत नाहीत, तोपर्यंत ओबीसींना न्याय मिळणार नाही असे म्हटले आहे.

राज्यातील ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून तीन मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. मंत्री भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांनी या बैठकीतून बाहेर पडत ओबीसी महामंडळासाठी निधीची तरतूद होत नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ओबीसींच्या वस्तीगृहांसाठी, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिष्यवृत्ती मिळत नाही. वस्तीगृहांची पायाभरणी झाल्याचेही ऐकिवात नाही.

या मंत्र्यांनी ओबीसी कल्याणासाठी केवळ ०.६ टक्के बजेटरी तरतूद असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या तिन्ही मंत्र्यांच्या भूमिकेचे हार्दिक अभिनंदन केले आहे. अशा प्रकारची भूमिका ओबीसी मंत्री जोपर्यंत सरकारमध्ये घेत नाहीत, तोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही, असे महासंघाने म्हटले आहे. ओबीसींवर अन्याय होत असल्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून मांडला जात आहे, परंतु सरकारमधील ओबीसी प्रतिनिधींनी ही भूमिका ठामपणे मांडल्याशिवाय सरकार त्याकडे लक्ष देणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. या बहिष्काराने ओबीसींच्या निधी आणि कल्याणाच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

Published on: Sep 02, 2026 02:28 PM

Follow Us