खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

