पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चे शतक; राज्यातील 9 जणांना आमंत्रण
पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात‘च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून बोलत आहेत. ते जनतेपर्यंत पोहतच आहेत. ते ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. त्यांच्या या रेडिओ कार्यक्रमाचे आता शतक होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातून विशेष आणि उल्लेखनिय काम करणाऱ्या 100 जणांना बोलविण्यात आले आहे. तर यावेळी मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित केला जाणार आहे. या विशेष कार्यक्रमाला राज्यातून 9 जणांची निवड करण्यात आली असून त्यांनी विशेष आमंत्रण देखील देण्यात आलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

