पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चे शतक; राज्यातील 9 जणांना आमंत्रण
पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात‘च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून बोलत आहेत. ते जनतेपर्यंत पोहतच आहेत. ते ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. त्यांच्या या रेडिओ कार्यक्रमाचे आता शतक होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि विशेष करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातून विशेष आणि उल्लेखनिय काम करणाऱ्या 100 जणांना बोलविण्यात आले आहे. तर यावेळी मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित केला जाणार आहे. या विशेष कार्यक्रमाला राज्यातून 9 जणांची निवड करण्यात आली असून त्यांनी विशेष आमंत्रण देखील देण्यात आलं आहे.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
