ठाकरे बंधूंची मातोश्रीवर भेट; अविनाश जाधवांनी सांगितलं भेटीचं मोठं कारण
मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सातवी भेट असून, जाधव यांनी याला कौटुंबिक बाब म्हटले आहे. सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही, मात्र निवडणुका जवळ आल्यावर याबाबत बोलू, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटींना महत्त्व दिले जात आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे यांनी सातव्यांदा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, यावर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या भेटीगाठी सतत होत राहणार आहेत. हे एक कुटुंब आहे आणि कुटुंब एकमेकांना भेटायला जाऊ शकते. बाळासाहेबांचे मोठे कुटुंब आहे आणि या भेटीगाठी आणखी वाढतील.” जाधव यांनी या भेटींना पूर्णपणे कौटुंबिक स्वरूप दिले.
सध्याच्या भेटीगाठी या कौटुंबिक असून, त्यांची सातत्यता कायम राहील असे त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुका आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता याबाबत विचारले असता, जाधव यांनी सांगितले की, “निवडणुका जवळ येऊ द्या, कारण अजून कुठल्याही प्रकारचे निवडणुकीचे बिगुल वाजलेले नाहीयेत. निवडणूक जवळ आल्यावर युती आणि इतर गोष्टींबाबत बोलू.” सध्याच्या भेटींमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

