AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा

| Updated on: Jun 17, 2026 | 12:05 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासूनच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, ही भूमिका स्पष्ट ठेवली आहे. पक्षाने दिलेलं योगदान आणि नेतृत्वाचं प्रेम विसरता येत नाही. हीच खरी निष्ठा आहे,” असे राऊत म्हणाले.

दरम्यान, संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी काही खासदारांवर अप्रत्यक्ष टीका केली. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मशाल चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनादेशाचा आदर करायला हवा. पक्षाशी आणि मतदारांशी बेईमानी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असे त्यांनी म्हटले.

राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना ही आमच्यासाठी केवळ राजकीय संघटना नसून भावनिक नातं आहे. “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात पक्ष योग्य निर्णय घेईल. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी संसदीय समितीच्या बैठकीचाही उल्लेख केला. “उद्या पक्षाच्या संसदीय समितीची बैठक होणार असून सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीनंतर पुढील रणनीती आणि निर्णय जाहीर केले जातील,” असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jun 17, 2026 12:05 PM

Follow Us