AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप

| Updated on: Jan 14, 2026 | 10:54 AM
Share

प्रचार कालावधी संपल्यावरही राजकीय पक्षांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची निवडणूक आयोगाची परवानगी संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे. सत्ताधारी पैशांचे वाटप करण्यासाठी या नियमाचा गैरवापर करत असल्याचा राऊतांचा आरोप आहे. शिंदे गट आणि भाजप पैशांचे वाटप व ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकत असल्याची टीका त्यांनी केली.

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या एका निर्णयावर गंभीर आक्षेप घेतला आहे. काल प्रचाराची मुदत संपल्यानंतरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात, असा नवा नियम निवडणूक आयोगाने लागू केल्याचे राऊत म्हणाले. हा निर्णय सत्ताधाऱ्यांसाठी तिळगुळ (विशेष सवलत) असल्याचे त्यांनी म्हटले. राऊतांच्या मते, सध्या घरोघरी पैशांचे वाटप सुरू आहे आणि हा नियम पैसे वाटण्याची मुभा देण्यासाठीच दिला असावा, अशी मतदारांच्या मनात शंका आहे. पैसे वाटणाऱ्यांना ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याने, या नियमाचा गैरवापर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शिंदे गट आणि भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, त्यांना कोणताही विचार नसून, फक्त हिंदू-मुसलमान आणि पैशांचे वाटप करून निवडणुका जिंकायची सवय आहे. लोकशाही वाचवण्यासाठी अशा गैरप्रवृत्तींना रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Published on: Jan 14, 2026 10:54 AM