Maharashtra Election 2026 : हरामाचा पैसा वाटला जातोय, असं भाजपचाच मंत्री म्हणतोय… राऊतांचं महायुतीतील अनागोंदीवर भाष्य
संजय राऊत यांनी गणेश नाईक यांच्या हवाल्याने हरामाचा पैसा वाटला जात असल्याचा आरोप केला आहे. महायुतीमधील शिंदे गट आणि भाजप यांच्यात आपापसात संघर्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अनागोंदी माजली असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी एकत्र यावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हरामाचा पैसा वाटला जातोय. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, हा पैसा आता वाटलाही जात आहे आणि आपापसात लुटलाही जात आहे. त्यांनी महायुतीमध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी होत असल्याचे चित्र मांडले आहे. याचबरोबर, अजित पवार भारतीय जनता पक्षाचा चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, तर देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे घोटाळे समोर आणत आहेत, असेही राऊत यांनी नमूद केले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजली आहे. राऊत यांनी दावा केला की, सत्तेतील हे तिन्ही पक्ष केवळ सत्ता आणि पैशासाठी एकत्र आले आहेत, त्यांना मुंबई किंवा मराठी माणसाचे काहीही पडलेले नाही. म्हणूनच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साद घातली आहे. मतदानादरम्यान संभाव्य बोगस मतदानाला सामोरे जाण्यासाठी भगवा स्क्वॉड सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Jan 15, 2026 02:50 PM
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
