AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...तर महाराष्ट्र माफ करणार नाही! संजय राऊतांनी दिला इशारा

…तर महाराष्ट्र माफ करणार नाही! संजय राऊतांनी दिला इशारा

| Updated on: Feb 26, 2026 | 10:57 AM
Share

संजय राऊत यांनी अजित पवार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार बारामतीमध्ये एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. राऊत यांच्या मते, हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून, गृहमंत्रालय आणि डीजीसीएने जबाबदारी घ्यावी. त्यांनी सरकारला इशारा दिला की, पाठीशी घातल्यास जनता माफ करणार नाही.

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे. रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये अजित दादांच्या चाहत्यांसह तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यामागे विधानभवनातून आलेल्या एका महत्त्वाच्या फोनचा दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी गृहमंत्रालय, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय आणि डीजीसीएने याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर खटले दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा महाराष्ट्राची जनता सरकारला माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

Published on: Feb 26, 2026 10:57 AM