Sanjay Raut : 2 ठाकरे सब पे भारी, ठाकरे ठिकऱ्या उडवणार! राऊतांनी विश्वास व्यक्त करताच शिंदेंच्या सेनेचा निशाणा
संजय राऊतांनी ठाण्यात ठाकरे बंधूंच्या युतीचा विश्वास व्यक्त करत 75 जागा जिंकण्याचा दावा केला. दोन ठाकरे सर्व विरोधकांवर भारी पडतील असे ते म्हणाले. यावर प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे यांनी राऊतांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले, तर मनसेच्या अविनाश जाधव यांनी त्यांचे समर्थन केले.
संजय राऊत यांनी ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची युती पक्की असून आगामी महापालिका निवडणुकीत 75 जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दोन ठाकरे सप्पे भारी, ठाकरे ठिकऱ्या उडवणार असा नारा त्यांनी दिला. राऊतांच्या या दाव्यावर शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे. बोलून जागा जिंकता येत नाहीत, असे म्हणत त्यांनी राऊतांना प्रथम भांडुपमध्ये नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान दिले. यावर श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर देत राऊतांचा आत्मविश्वास पूर्वी विधानसभेतही होता, असे नमूद केले.
महायुती बहुसंख्य ठिकाणी महापौर आणि नगराध्यक्ष बसवेल असा दावा त्यांनी केला. मनसेचे अविनाश जाधव यांनी मात्र संजय राऊतांच्या 75 पारच्या आकड्याला पाठिंबा दिला. ईव्हीएममध्ये घोटाळा न झाल्यास शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची टीम मिळून हा आकडा पार करेल, असे ते म्हणाले. ठाण्यातील राजकीय वातावरण यामुळे तापले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

