AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'दहा वेळा साड्या बदलणारी लोकं तुम्ही, भविष्यात तुम्हालाही धक्का बसणार...', राऊतांचा भाजपच्या बड्या मंत्र्यावरच नेम

‘दहा वेळा साड्या बदलणारी लोकं तुम्ही, भविष्यात तुम्हालाही धक्का बसणार…’, राऊतांचा भाजपच्या बड्या मंत्र्यावरच नेम

| Updated on: Feb 23, 2025 | 2:07 PM
Share

प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय हा योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे. अशी टीका भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली होती. दरम्यान, राधाकृष्ण विखेपाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळलं असून ते बेताल विधान करत आहेत. प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय हा योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे. अशी टीका भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली होती. दरम्यान, राधाकृष्ण विखेपाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोण विखे पाटील जे दहा वेळा पक्ष सोडून पळून गेले. त्यांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्यांनी विसरू नये. त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहे. दहा वेळा साड्या जशा बदलतात तशी पक्ष बदलणारी ही लोकं आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये’, असं संजय राऊत यांनी पलटवार करत जिव्हारी लागणारी टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले, तुम्हाला देखील भविष्यात धक्का बसेल विसरू नका. धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलत आहेत. हिम्मत आणि धाडस असते तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेस पक्षांनी तुम्हाला सर्व काही दिलं मानपान प्रतिष्ठान सत्ता शिवसेनेने देखील तुम्हाला दिली आहे. त्या शिवसेनेबद्दल तुम्ही असं वक्तव्य करतात हा निर्लज्य आणि नीचपणा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Published on: Feb 23, 2025 02:07 PM