Sanjay Shirsat : आता बस्स झालं… पुढे राहीन की नाही माहिती नाही… शिंदेंचा बडा मंत्री राजकारणातून निवृत्त होणार? थेट दिले संकेत
मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. चार वेळा आमदार राहिल्यानंतर, शिरसाट म्हणाले की, राजकारणात कधी थांबायचे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. कोणताही नेता कायमस्वरूपी नसतो आणि जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या राजकारणातून एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, “मी चार टर्म आमदार राहिलो आहे, पुढे राहीन की नाही माहीत नाही.” राजकारणात कधी थांबले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.
शिरसाट पुढे म्हणाले की, राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेला नाही. जोपर्यंत आपले हातपाय चालतात, तोपर्यंत चांगले काम करावे. “प्रत्येक वेळेला आपण अमृत पिऊन आलेलो आहोत, मीच कायम तिथे राहीन असं काही नसतं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कालच्या भाषणाचा संदर्भ देत, त्यांनी “आता बस झालं” असे म्हटले होते. ते दहा वर्षे नगरसेवकही राहिले आहेत. एक प्रसंग सांगताना, त्यांनी एका आयुक्तांचा उल्लेख केला जो २०४३ पर्यंत मुख्य सचिव होईल, परंतु “मी २०४३ ला थोडी राहणार आहे? इतकी वर्षे जगण्याची माझी इच्छा नाही,” असे त्यांनी विनोदाने सांगितले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

