Sarnaik-Wadettiwar Land Row: 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली? वडेट्टीवारांच्या आरोपांवर काय म्हणाले सरनाईक?
विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर मीरा-भाईंदरमधील २०० कोटींची जागा ३ कोटींना लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. सरनाईक यांनी हे आरोप फेटाळून लावत कागदोपत्री पुरावा मागितला आहे. संजय शिरसाट यांनी यावर रितसर तक्रार दिल्यास चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.
शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीरा-भाईंदर येथील २०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३ कोटी रुपयांना लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी चार एकर जमीन नियमाबाह्य पद्धतीने घेतल्याचे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
विजय वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर बोलताना प्रताप सरनाईक यांनी विजय वडेट्टीवार यांना त्यांचे आरोप सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. केवळ प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, जर कुणाकडे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी रितसर तक्रार दाखल करावी. तक्रार प्राप्त झाल्यास सरकार निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी करेल. पुराव्याशिवाय केलेले आरोप हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असतात, असेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....

