AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईची तीन बोटं तुमच्याकडे निर्देश करतात, सामनातून भाजपवर टीका

महागाईची तीन बोटं तुमच्याकडे निर्देश करतात, सामनातून भाजपवर टीका

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 9:33 AM
Share

नरेंद्र मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टीचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार? हा सामान्य माणसासमोरील आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सामनाच्या अग्रलेखातून महागाईची तीन बोटे याद्वारे महागाईच्या मुद्यावरुन भाजपला प्रश्न विचारण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टीचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार? हा सामान्य माणसासमोरील आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि कॉग्रेस सरकारांकडेच बोट दाखविणार आहे का? या एका बोटाचे सोडा, पण इंधन तेलापासून खाद्यतेलापर्यत, भाजीपाल्यापासून मसाल्याच्या पदार्थांपर्यंत सर्वच बाबतीत महागाई रोज जो नवीन उच्चांक गाठत आहे, त्याची तीन बोटे तुमच्याकडेच निदेश करीत आहेत, असं सामनात म्हटलंय.