AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसोबत जाणं संजय राऊत यांच्यामुळे लांबणीवर गेलं? सुनील तटकरे भडकले अन् म्हणाले...

भाजपसोबत जाणं संजय राऊत यांच्यामुळे लांबणीवर गेलं? सुनील तटकरे भडकले अन् म्हणाले…

| Updated on: Mar 01, 2024 | 1:12 PM
Share

शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबतच का? भाजपसोबत जाणं संजय राऊत यांच्यामुळे लांबणीवर गेलं? यावर बोलताना तटकरे म्हणाले, संजय राऊत कोण आम्ही कुठे जावं हे ठरवणारे. त्यांच्या पक्षातील लोक त्यांचं ऐकत नाही. आम्ही कसे ऐकणार. संजय राऊत यांच्याबद्दल आदर पण...

मुंबई, १ मार्च २०२४ : शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबतच का? यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावर म्हणाले, शरद पवार आणि दादा असा मुद्दा नाही. पक्षातील लोकांना वाटत होतं आपण सत्तेत सहभागी व्हावं. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार जाणार असं वाटत होतं. त्यावेळी विधीमंडळात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांना पत्र लिहून भाजपमध्ये जायचं ठरलं. हे २०२२ मध्ये ठरलं. तेव्हा सह्या केल्या होत्या. राजकारणातील एवढी मोठी समजणारी माणसं त्या बैठकीत काहीच निर्णय झाला नसताना कशी सह्या करतील. पत्रात सर्व नमूद केलेलं असताना चर्चा झालेली असतानाच सह्या झाल्यात. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षनेतृत्वाने पाठिंबा द्यावा, असा पत्राचा आशय होता. चर्चेची सुरुवात कुणी केली, कोण काय बोललं कुणी काय वाक्य वापरली हे मी गुलदस्त्यात ठेवल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले. भाजपसोबत जाणं संजय राऊत यांच्यामुळे लांबणीवर गेलं? यावर बोलताना तटकरे म्हणाले, संजय राऊत कोण आम्ही कुठे जावं हे ठरवणारे. त्यांच्या पक्षातील लोक त्यांचं ऐकत नाही. आम्ही कसे ऐकणार. राऊत यांच्याबद्दल आदर आहे. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत. प्रतिथयश संपादक आहेत. त्यांचं लिखाण चांगलं आहे. पण त्यांच्या बोलण्यामुळे आमचं जाणं थांबलं असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांची माणसं थांबवता आले नाही, आम्हाला कसे थांबवतील. शिवसेनेतील एका तरी व्यक्तीला राऊतांनी थांबवलं का? असा सवालही त्यांनी केला.

Published on: Mar 01, 2024 01:12 PM