भाज्यांचे गणित कोलमडले, रान भाज्यांना मागणी वाढली; टोमॅटोच्या दरातही वाढ
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुसळधार पावसाचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात भाज्यांची आवकीवर झाला आहे. येथून होणारी पालेभाज्यांची आवक मंदावली आहे.
रत्नागिरी, 31 जुलै 2023 | कोकण पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणात शेतीला बसला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुसळधार पावसाचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात भाज्यांची आवकीवर झाला आहे. येथून होणारी पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. तर बाजारात टोमॅटो, मटार, फरसबी, घेवडा, मिरची यांची आवक कमी झाली आहे. तर त्याचा थेट परिणाम हा कोकणात होत आहे. कोकणात पालेभाज्यांची आवक मंदावल्याने गृहिणीचे गणित कोलमडलं आहे. येथे बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. तर टोमॅटोचा दर तब्बल 140 किलो, मटार 150 रुपये किलो, फरसबी 100 रुपये किलो, लसूण 180 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. त्यामुळे सध्या कोकणात पावसाळ्यातील रान भाज्यांना मागणी वाढली आहे.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

