आधी शेतकऱ्याला रडवलं, अन् आता ग्राहकांना; टॉमेटोला आला सोन्याचा भाव
त्यातल्या त्यात कांदा थोडा वधारला मात्र टोमॅटोला दर काही मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील टोमॅटोवर नांगर फिरवला. तर अनेकांनी तो रस्त्याच्याकडेला टाकला. पण आता तोच टोमॅटो सोनाच्या भावात जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता अरे देवा म्हणायची वेळ आली आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यात कांदा आणि टोमॅटोनं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान झालं होतं. त्यातल्या त्यात कांदा थोडा वधारला मात्र टोमॅटोला दर काही मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील टोमॅटोवर नांगर फिरवला. तर अनेकांनी तो रस्त्याच्याकडेला टाकला. पण आता तोच टोमॅटो सोनाच्या भावात जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता अरे देवा म्हणायची वेळ आली आहे. तर टोमॅटो हा 100 ते 110 रूपये झाल्याने सामान्य ग्राहकांचे मात्र बजेट बिघडले आहे. आषाढी एकादशी आणि ईद उल जुहा (तीन दिवसीय मेजवानी) हे दोन महत्त्वाचे सण गुरुवार 29 जून रोजी येत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. शहराच्या काही भागात टोमॅटोचे भाव 80 ते 110 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तर टोमॅटोचे दर जर कमी करायचे असतील तर स्टोरेज वाढवा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
