AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, न्याय मिळेपर्यंत...; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, न्याय मिळेपर्यंत…; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Nov 05, 2025 | 11:10 AM
Share

उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सरकारच्या पॅकेजला शेतकऱ्यांची थट्टा संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठवाड्यात कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या सरकारच्या पॅकेजवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला शेतकऱ्यांची थट्टा असे संबोधले. मराठवाड्यात आलेल्या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ते कोणताही राजकीय प्रचार करण्यासाठी आलेले नाहीत, कारण शेतकरी या आश्वासनांना कंटाळले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालत म्हटले की, राजकीय नेते नेहमी निवडणुकांच्या वेळी येतात आणि स्वप्ने दाखवून जातात. गेल्या वर्षभरात मराठवाडा आणि महाराष्ट्रावर आपत्तींचा डोंगर कोसळला आहे. अवकाळी पाऊस थांबायला तयार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मराठवाडा हा साधारणतः अवर्षणग्रस्त प्रदेश असतो, परंतु यावेळी इतका पाऊस झाला की ज्येष्ठ शेतकऱ्यांनीही असा अनुभव कधी घेतला नसल्याचे सांगितले. ठाकरे यांनी यापूर्वीही मोठ्या पावसानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी मराठवाड्यात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असून, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, असे त्यांनी या दौऱ्यात अधोरेखित केले.

Published on: Nov 05, 2025 11:10 AM