मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसताय, संजय राऊत यांचा रोख कुणावर?
मर्जीतल्या उद्योगपतींना ठेके देऊन त्या बदल्यात निवडणूक निधी म्हणून शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचे हा भाजपचा गोरखधंदा आहे. म्हणून त्यांच्या तिजोरीत हजारो कोटी जमा आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाही. ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड विकत घेऊन भाजपची तिजोरी भरली त्यांची नाव जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये वरचे नाव अदानींचे असणार अशी खात्री संजय राऊत यांनी व्यक्त केली. तर मर्जीतल्या उद्योगपतींना ठेके देऊन त्या बदल्यात निवडणूक निधी म्हणून शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचे हा भाजपचा गोरखधंदा आहे. म्हणून त्यांच्या तिजोरीत हजारो कोटी जमा आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. तर मुंबईतील मिठागराची जागा अदानींना, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना आणि आता वांद्रे रेक्लमेशनचा भूखंडही अदांनींना..अख्खी मुंबई अदानींना….मुंबईचे नाव बदलून अदानीनगर केले तर मुंबईसाठी हुतात्मा झालेले १०६ जण पुन्हा स्वर्गात हौताम्य पत्करतील, असे म्हणत शिंदे काय करत आहे, असा सवाल केला. मुंबईवरचा ठसा पुसला जातो आणि हे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसलेत, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय.
Published on: Feb 17, 2024 03:46 PM
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
