AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल करत घणाघात

Uddhav Thackeray : आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल करत घणाघात

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jan 10, 2026 | 1:00 PM
Share

राजकारणात दोन भाऊ एकत्र आल्यास भाजपला मिरची का लागते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मुंबईचे मराठीपण टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडल्याचा आरोप करत, मुंबई मराठी माणसाचीच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत, राजकारणात आपण आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्यांना मिरची का लागते, असा सवाल उपस्थित केला. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांची युती सत्तेसाठी नसून, मराठी माणसाच्या हितासाठी आणि मुंबईचे मराठीपण जपण्यासाठी आहे. मराठी माणसाला मुंबईत घर नाकारले जात आहे, यावर त्यांनी भर दिला. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देत, मोरारजी देसाईंच्या कार्यकाळात मुंबईवर गुजरातचा डोळा होता, हे ठाकरेंनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अवहेलनेविरोधात शिवसेना स्थापन केली होती. २०१४ मध्ये भाजपने युती तोडली आणि २०१९ मध्ये पुन्हा पाठीत सुरा खुपसला, असा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबईवर कब्जा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने शिवसेना तोडली आणि मराठी मते फोडण्यासाठी शाहसेनेला जन्म दिला, असा दावा त्यांनी केला. आम्ही सत्ता मिळवून मुंबई मराठी माणसाकडेच ठेवणार, असे ठाकरे यांनी ठामपणे नमूद केले.

Published on: Jan 10, 2026 12:57 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?