Unseasonal Rain : जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
Unseasonal Rains in Latur Udgir : राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. सलग दोन दिवसांपासून या भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आंबा बागायतदारांचं चांगलच नुकसान झालं आहे.
राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी पूर्व मशागतीवर देखील या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....

