Unseasonal Rain : जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
Unseasonal Rains in Latur Udgir : राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. सलग दोन दिवसांपासून या भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आंबा बागायतदारांचं चांगलच नुकसान झालं आहे.
राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी पूर्व मशागतीवर देखील या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

