AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : राज्य सकारची बनवाबनवी, शेतकऱ्यांनी एक तास दिवे बंद करुन निषेध करावा; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : राज्य सकारची बनवाबनवी, शेतकऱ्यांनी एक तास दिवे बंद करुन निषेध करावा; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

| Updated on: Oct 17, 2025 | 11:37 AM
Share

विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत मागे घेतल्याचा, पीक खरेदीतील अटींमुळे होणारे नुकसान आणि बाजार समितीतील गैरव्यवहारांवर त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी दिवे बंद करून काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध करावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या सवलती सरकारने १० ऑक्टोबर रोजी रद्द केल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये जमीन महसुलात सूट, कर्ज वसुलीस स्थगिती आणि वीज बिलात माफी यांसारख्या घोषणांचा समावेश होता. सरकार लोकांसमोर वेगळे चित्र मांडत असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.

केंद्राकडून एनडीआरएफची मदत अद्याप मिळालेली नाही, तसेच कापूस खरेदीच्या अटी आणि सोयाबीनला मिळणारे अत्यल्प दर यामुळे शेतकरी संकटात आहेत. सरकार केवळ ६,५०० कोटी रुपयांचे पॅकेज देत असून, तेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागेल, असे सांगत वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी एक तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील प्रशासकीय मंडळांना बरखास्त करून मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग उघडल्याचाही आरोप केला.

Published on: Oct 17, 2025 11:37 AM