Chanakya Exit Poll | ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता? Exit Polls चे थक्क करणारे आकडे समोर!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 89.99 टक्के मतदानाची नोंद झाली असून, पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. याआधी झालेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या टप्प्यातही जवळपास 90 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने राज्यातील निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 89.99 टक्के मतदानाची नोंद झाली असून, पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. याआधी झालेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या टप्प्यातही जवळपास 90 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने राज्यातील निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण आधीपासूनच तापलेले असून, या टप्प्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दरम्यान, विविध एक्झिट पोल्सनुसार यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सर्वेक्षणांनुसार भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागांपर्यंत मर्यादित राहावे लागू शकते, असेही भाकीत करण्यात आले आहे.
तथापि, पश्चिम बंगालमध्ये नेहमीच अनपेक्षित निकाल लागण्याची परंपरा पाहायला मिळते, त्यामुळे प्रत्यक्ष निकालात उलटफेर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 2011 पासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर यंदा मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मागील निवडणुकीत भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या, तर यावेळी त्यांच्या जागांमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड कायम राहणार की सत्तांतर होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरच राज्यातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..

