AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार

कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. आपण त्याला कसं हाताळतो, यावर सर्व अवलंबून असते. दुबई आणि दिल्लीतील काम सोडून दोन भाऊ गावात आले. त्यांनी मच्छीपालन सुरू केले. दीड वर्षानंतर उत्पन्न मिळू लागले. यात त्यांनी गावात १५ जणांना रोजगार दिला.

Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 09, 2023 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली : काही लोकांना असं वाटते की, शेती किंवा मच्छलीपालनात फारशी कमाई होत नाही. फक्त नोकरी करून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते. पण, असं काही नाही. भारतातील काही युवकांनी नोकरी सोडून घरी व्यवसाय सुरू केलेत. हे युवक फक्त व्यवसायच करत नाही, तर गावात रोजगार निर्मिती करतात. या युवकांत बिहारमध्ये राहणारे दोन सख्खे भाऊ आहेत. यापैकी एका भावाने सव्वा लाख रुपये महिन्याची नोकरी सोडली. गावात येऊन मच्छीपालन सुरू केले. आता त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. हे दोन्ही भाऊ उमामगंज भागातील पडरिया गावचे रहिवासी आहेत. एका भावाचं नाव आहे करणवीर सिंह तर दुसऱ्या भावाचे नाव आहे विशाल कुमार सिंह. करणसिंह यांनी दिल्लीतून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. १२ वर्षे दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी केली. परंतु, लॉकडाऊनमध्ये घर परत आले ते गेलेच नाही. गावात त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्लान केला. काही तज्ज्ञांशी सल्ला करून त्यांनी आधुनिक शेती आणि मच्छीपालन सुरू करण्याचा प्लान केला.

कृषी मंत्र्यांनी केले सन्मानित

विशाल कुमार सिंह यांचा दिल्लीत स्वतःचा व्यवसाय होता. पण, लॉकडाऊनमध्ये तो व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी गावात येणे पसंत केले. दोन एकरचा खासगी तलाव तसेच ९ एकरचा तलाव लिजवर घेऊन मच्छीपालन सुरू केले. आता दोन्ही भाऊ मच्छीपालनातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. करणवीर सिंह म्हणतात, सुरुवातीला दीड वर्षे त्यांना गुंतवणूक करावी लागली. कमाई नाहीच्या बरोबर होती. हळूहळू नफा वाढत गेला. मच्छीपालनासाठी बिहारच्या कृषी मंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.

या जातीचे मच्छीपालन

विशाल कुमार सिंह यांचा दिल्लीत व्यवसाय होता. पण, चायनीज माल आल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. हजारीबाग येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. परंतु, लॉकडाऊनमध्ये त्याही व्यवसायात तोटा झाला. त्यामुळे विशाल यांनी करणवीरसोबत मच्छीपालन सुरू केले. यातून त्यांना वार्षिक दहा लाख रुपयांचा नफा होत आहे. रुपचंदा, इंडियन मेजर कार्प, ग्रास कार्प आणि पहाडी मच्छीपालन करतात. स्थानिक बाजारात याची विक्री करतात. याची मागणी औरंगाबादपर्यंत होत आहे.

करणवीर सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही भाऊ मिळून १५ ते २० टन मासे विकतात. यातून त्यांची लाखो रुपयांची कमाई होते. या व्यवसायात त्यांनी १० ते १५ लोकांना रोजगार दिला. शिवाय वर्षाला दहा लाख रुपायांचा शुद्ध नफा कमावतात.

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं