AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादकाचा वाहतूक खर्चही निघेना, कांद्यावर असे केले विधीवत अंत्यसंस्कार

कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला.

कांदा उत्पादकाचा वाहतूक खर्चही निघेना, कांद्यावर असे केले विधीवत अंत्यसंस्कार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 01, 2023 | 9:57 PM
Share

नाशिक : सध्या अवकाळी पाऊस, गारपिटीने काही भागात त्रस्त केले. याचा फटका पिकांना बसत आहे. कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. सततच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्ण भिजून गेला. बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नव्हता. नैराश्यातून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील युवा शेतकरी योगेश सोनवणे यांनी चक्क शेतात साठवून ठेवलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार केले. ट्रॅक्टरने कांदा शेतात पसरवून नष्ट करीत विधीवत अंत्यविधी करून भावनांना मोकळी वाट करून दिली.

पोटाच्या पोरासारखा जपलेला कांदा पावसाने भिजल्याने शेतकरी अडचणीत आलेत. मायबाप सरकारने किमान शेतकऱ्यांना मदतीची हात देऊन उभे करावे. तसेच काही दिवस सक्तीची वीजबिल आणि कर्ज वसुली तूर्त थांबवून अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी सोनवणे यांनी व्यक्त केली.

१६ एकर बागेतील नुकसान

दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथ काल प्रचंड गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक खराब झालीय. देऊळगाव साकर्शा येथील शेतकरी गणेश गायकवाड यांच्या 16 एकर शेतातली आंबा, चिकू, निंबू, सफरचंद बागेचे अतोनात नुकसान झाले. आंबा फळ आता काढायला आले होते.

आर्थिक मदतीची मागणी

मात्र रात्रीच्यावेळी अचानक वादळी वारा आणि गारपीट झाली. यामधे आंब्यांच्या फळाला गारपिटीचा फटका बसला. फळ खाली पडली, तर झाडावरील फळांना मार लागल्याने ती खराब झालीत. यामुळे शेतकरी गणेश गायकवाड यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शासनाने त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी गायकवाड यांनी केलीय.

फळबागा उद्धवस्त झाल्याने आता कुणाच्या दारासमोर हात पसरवावे, असा प्रश्न फळबाग उत्पादकाला पडला आहे. सरकारी मदतीकडे शेतकरी आस लावून बसले आहेत.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.