AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता.

Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी
पावसामुळे पाणी साचल्याने थेट वावरामध्येच विद्युत प्रवाह संचारला आहे. यामध्येच दोन बैलांचा मृत्यू झाला.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 17, 2022 | 11:44 AM
Share

पुणे : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. आतापर्यंत (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा आणि आता महावितरणचा ‘शॉक’. पावसाने उसंत घेतल्यानंतर आता कुठे शेती कामाला वेग येत आहे. पुणे जिल्ह्यतील भोर तालुक्यातही (Paddy Crop) भात लावण्यासाठी चिखल करणीचे काम सुरु आहे. बैलजोडीच्या माध्यमातून हे काम सुरु असतानाच अचानाक विजेचा धक्का लागल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला तर गरबुट पायामध्ये असल्याने दोन शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. शेतीकामे सुरु असतनाच अचानक आपल्या सर्जा-राजाला गमवावे लागले आहे. मध्यंतरीच्या पावसाने (Electric shock) विजेच्या खांबाचा वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ही हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे.

बांधावर विद्युत खांब, वीज प्रवाह पाण्यात

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता. त्यामुळे ही घटना घडली. मात्र, अचानक सर्वकाही झाल्याने शेतकऱ्यांनाही याबाबत काही समजले नाही. मात्र, बैलांना बाहेर काढताना त्यांनाही शॉक लागला त्यामुळे घटना नेमकी कशामुळे घडली हे त्यांच्या निदर्शणास आले .

नशिबाने वाचले शेतकऱ्यांचे प्राण

हरिश्चंद्री गावातले शेतकरी रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे भात लावणी साठी बैलाच्या साह्याने पारंपारिक पद्धतीने शेतात चिखल करत होते.विजेचा धक्का लागल्यान बैल अचानक खाली कोसळले, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या पायात गमबूट असल्यानं ते थोडक्यात बचावलेत. दरम्यान बैलांना शॉक बसल्यावर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, मात्र त्यांनाही शॉक बसू लागल्यानं ते खाचराच्या बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. खांबाला अर्थिंग नसल्यानं वीज प्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने, महावितरणच्या हलगर्जी पणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एैन बैल पोळ्याच्या तोंडावर गमावली बैलजोडी

पोळा हा बैलांचा सण. आता खरिपाची पेरणी उरकताच शेतकऱ्यांना या सणाचे वेध लागतात. मात्र, दुर्घटनेमुळे पोळा सण करावा की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. एकाच वेळी दोन बैलांचा आणि ते ही डोळ्यादेखत झालेला मृत्यू यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याचं बरोबर बैल गेल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाल आहे.

Follow Us
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी