AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता.

Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, भात लागवड करतानाच विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू, नशिबाने वाचले शेतकरी
पावसामुळे पाणी साचल्याने थेट वावरामध्येच विद्युत प्रवाह संचारला आहे. यामध्येच दोन बैलांचा मृत्यू झाला.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 11:44 AM
Share

पुणे : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. आतापर्यंत (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा आणि आता महावितरणचा ‘शॉक’. पावसाने उसंत घेतल्यानंतर आता कुठे शेती कामाला वेग येत आहे. पुणे जिल्ह्यतील भोर तालुक्यातही (Paddy Crop) भात लावण्यासाठी चिखल करणीचे काम सुरु आहे. बैलजोडीच्या माध्यमातून हे काम सुरु असतानाच अचानाक विजेचा धक्का लागल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला तर गरबुट पायामध्ये असल्याने दोन शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. शेतीकामे सुरु असतनाच अचानक आपल्या सर्जा-राजाला गमवावे लागले आहे. मध्यंतरीच्या पावसाने (Electric shock) विजेच्या खांबाचा वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ही हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे.

बांधावर विद्युत खांब, वीज प्रवाह पाण्यात

भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात शेतात भात लावणीसाठी चिखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोन शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून हे काम करीत होते. काम सुरु असतानाच अचानक दोन्ही बैलेही जागेवर पडली. मध्यंतरीच्या पावसाने बांधावर असलेल्या विद्युत खांबातील प्रवाह हा शेतात साठलेल्या पाण्यात संचारला होता. त्यामुळे ही घटना घडली. मात्र, अचानक सर्वकाही झाल्याने शेतकऱ्यांनाही याबाबत काही समजले नाही. मात्र, बैलांना बाहेर काढताना त्यांनाही शॉक लागला त्यामुळे घटना नेमकी कशामुळे घडली हे त्यांच्या निदर्शणास आले .

नशिबाने वाचले शेतकऱ्यांचे प्राण

हरिश्चंद्री गावातले शेतकरी रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे भात लावणी साठी बैलाच्या साह्याने पारंपारिक पद्धतीने शेतात चिखल करत होते.विजेचा धक्का लागल्यान बैल अचानक खाली कोसळले, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या पायात गमबूट असल्यानं ते थोडक्यात बचावलेत. दरम्यान बैलांना शॉक बसल्यावर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, मात्र त्यांनाही शॉक बसू लागल्यानं ते खाचराच्या बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. खांबाला अर्थिंग नसल्यानं वीज प्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने, महावितरणच्या हलगर्जी पणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एैन बैल पोळ्याच्या तोंडावर गमावली बैलजोडी

पोळा हा बैलांचा सण. आता खरिपाची पेरणी उरकताच शेतकऱ्यांना या सणाचे वेध लागतात. मात्र, दुर्घटनेमुळे पोळा सण करावा की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. एकाच वेळी दोन बैलांचा आणि ते ही डोळ्यादेखत झालेला मृत्यू यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याचं बरोबर बैल गेल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाल आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.