AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे.

अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं
coconut treeImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 2:25 PM
Share

नाशिक : सिन्नर (Sinner) तालुक्यातील कारवाडी (karwadi) वीज पडून नारळाचे झाड (coconut tree) पेटल्याची घटना घडली असून तालुक्याच्या पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसात सुरू झाली होती. दरम्यान शहा-कारवाडी रोडलगत राहणाऱ्या संतोष सोपानराव जाधव यांच्या घराजवळ असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या वरच्या भागाने पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. स्थानिक तरुणांनी तात्काळ औषध फवारणीचे प्रेशर ब्लोअरच्या साह्ययाने आग विझविली.

गत मार्च महिन्यात नांदेड जिल्ह्यात आवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, जिल्ह्यातील 35 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवला होता. या नुकसानीचे अनुदान नांदेडच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच अनुदान वाटप केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. शेतीच्या नुकसानीचे अनुदान इतक्या जलदगतीने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, हरभरा, बाजरी आणि मक्याची आवाज मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अवकाळी पावसाची वाढती भीती व वातावरणातील होणारे वारंवार बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्या दरामध्ये शेतमाल विकायला सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये आवक अचानक वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम दरांवर झाल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकांना मोठा फटका बसला होता. त्याचा परिणाम या पिकांवर झाल्याचही दिसून आले. अनेक शेतकऱ्यांचा कृषीमाल हा अवकाळी पावसामुळे डागाळला गेल्याने त्याला कमी किंमत मिळत आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, मात्र बागायतदार शेतकरी आता मागच्या सर्व सोडून नवीन पेरणीसाठी तयारी करताना दिसून येत आहे. शेतकरी मशागतीसाठी पारंपारिक पद्धतीने मशागती करण्यावर भर देताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणावर बागायतदार शेतकरी आहेत. यामुळे उन्हाळी पिकांसाठी शेतकरी आता मशागती करून पेरणीची तयारी करणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरपाई वेळेवर मिळाले तर पेरणी करण्यासाठी पैसे येतील आणि पेरणी लवकर होणार आहे. त्यामुळे आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागून आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.