AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे.

अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं
coconut treeImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 2:25 PM
Share

नाशिक : सिन्नर (Sinner) तालुक्यातील कारवाडी (karwadi) वीज पडून नारळाचे झाड (coconut tree) पेटल्याची घटना घडली असून तालुक्याच्या पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसात सुरू झाली होती. दरम्यान शहा-कारवाडी रोडलगत राहणाऱ्या संतोष सोपानराव जाधव यांच्या घराजवळ असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या वरच्या भागाने पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. स्थानिक तरुणांनी तात्काळ औषध फवारणीचे प्रेशर ब्लोअरच्या साह्ययाने आग विझविली.

गत मार्च महिन्यात नांदेड जिल्ह्यात आवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, जिल्ह्यातील 35 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवला होता. या नुकसानीचे अनुदान नांदेडच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच अनुदान वाटप केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. शेतीच्या नुकसानीचे अनुदान इतक्या जलदगतीने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, हरभरा, बाजरी आणि मक्याची आवाज मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अवकाळी पावसाची वाढती भीती व वातावरणातील होणारे वारंवार बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्या दरामध्ये शेतमाल विकायला सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये आवक अचानक वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम दरांवर झाल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकांना मोठा फटका बसला होता. त्याचा परिणाम या पिकांवर झाल्याचही दिसून आले. अनेक शेतकऱ्यांचा कृषीमाल हा अवकाळी पावसामुळे डागाळला गेल्याने त्याला कमी किंमत मिळत आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, मात्र बागायतदार शेतकरी आता मागच्या सर्व सोडून नवीन पेरणीसाठी तयारी करताना दिसून येत आहे. शेतकरी मशागतीसाठी पारंपारिक पद्धतीने मशागती करण्यावर भर देताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणावर बागायतदार शेतकरी आहेत. यामुळे उन्हाळी पिकांसाठी शेतकरी आता मशागती करून पेरणीची तयारी करणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरपाई वेळेवर मिळाले तर पेरणी करण्यासाठी पैसे येतील आणि पेरणी लवकर होणार आहे. त्यामुळे आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागून आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.