AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : यंदाच्या हंगामात घरच्या सोयाबीन बियाणांवरच भर, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय?

पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही आणि उगवले तरी शेंगा लागल्याच नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण संपूर्ण हंगाम वाया जातो. सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट हे यशस्वी होतीलच असे नाही. शिवाय यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याने बाजारपेठेतील बियाणे पुरेल का नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Kharif Season : यंदाच्या हंगामात घरच्या सोयाबीन बियाणांवरच भर, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय?
बियाणे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 06, 2022 | 9:40 AM
Share

औरंगाबाद : उत्पादन आणि उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून (Kharif Season) खरीप हंगामच महत्वाचा आहे. उत्पादनावर खर्च कमी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागाचीही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी (Soybean Seeds) बाजारपेठेतील विकतचे बियाणे घेण्यापेक्षा घरगुती बियांणावरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. यामुळे खर्च कमी आणि (Production Increase) उत्पादन अधिक अशी परस्थिती निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुन बियाणांचा वापर करणेही तेवढेच महत्वाचे आहे. खरीप हंगामात एक ना अनेक पर्याय अवलंबून उत्पादन वाढीचा प्रयत्न राहणार आहे.

विकतच्या बियाणांच्या तक्रारी अधिक

पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही आणि उगवले तरी शेंगा लागल्याच नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण संपूर्ण हंगाम वाया जातो. सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट हे यशस्वी होतीलच असे नाही. शिवाय यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याने बाजारपेठेतील बियाणे पुरेल का नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून आतापासूनच सुक्ष्म नियोजन केले तरच उत्पादनात वाढ आणि खर्चात कमी होणार आहे.

घरच्या घरी अशी करा बीजप्रक्रिया

पेरणीच्या आगोदर सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजेत बीजप्रक्रिया. शेतात सोयाबीन उभे असताना भेसळ काढणे तसेच कीड व रोगग्रस्त झाडे काढूण टाकणे महत्वाचे आहे. काढणी पश्चातही उगवण टिकवून ठेवण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.सोयाबीन वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थर करावे लागणार आहेत. शिवाय मळणी करताना 13 ते 14 आर्द्रता असू नये. मळणीनंतर पोत्यात भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

दोन वर्ष बियाणे बदलण्याची गरज नाही

दरवर्षी बियाणे बदलावे असे काहीच नाही. एकदा वापरलेले बियाणे हे पुढील वर्षी देखील वापरता येणार आहे. दरवर्षी नवीन बियाणे वापरल्याने खर्चात वाढ होते पण उत्पादनाची हमी नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची हमी नाही. शिवाय यामुळे खर्चात वाढ झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विकतच्या बियाणांपेक्षा घरच्या बियाणांवरच भर देणे गरजेचे आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप