AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : शेतात पीक घेतलं, अधिक पैसे कमवण्यासाठी शेतकऱ्याने आयडिया केली, कमावले लाखो रुपये

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांबरोबर त्याला योग्य तो पूरक व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली उन्नती साधावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Agriculture News : शेतात पीक घेतलं, अधिक पैसे कमवण्यासाठी शेतकऱ्याने आयडिया केली, कमावले लाखो रुपये
farmerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 10:18 AM
Share

बुलढाणा : आजही अनेक शेतकरी (farmer) आपल्या शेतात पारंपरिक पीके (crop) घेतात. अतिवृष्टी किंवा कोरड्या दुष्काळामुळे त्याचे नुकसान झाल्यास हताश होतात. तर काही शेतकरी आत्महत्या सारखा मार्ग देखील स्विकारतात, परंतु शेतीला जोडधंदा केल्यास शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधू शकतात, याचे उदाहरण उत्तम उदाहरण (buldhana khamgaon farmer) खामगाव तालुक्यातील एक शेतकरी आहे. पैसे कमवण्यासाठी आयडिया केली अन् ती कामी आली. भागवत भारसाकडे असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याचबरोबर चांगले पैसे कमावल्यामुळे त्याचं सगळीकडे कौतुक देखील होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहना येथील भागवत भारसाकडे हे आपल्या शेतातील ऊस आधी व्यापाराला विकायचे. मात्र त्यामध्ये त्यांना फारसे उत्पन्न व्हायचे नाही, त्यामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी शेतीला जोड धंदा म्हणून आपल्याच शेतातील उसाच्या भरवशावर शेताजवळच रसवंती सुरू केली. ग्राहकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय, आणि आज रोजी आपल्या एक एकर शेतातील ऊस आणि रसवंतीच्या व्यवसायावर ते पाच महिन्यात चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. रसवंती सुरू करण्यापूर्वी त्यांना एक एकर ऊसामध्ये केवळ एक लाख रुपये उत्पन्न व्हायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांबरोबर त्याला योग्य तो पूरक व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली उन्नती साधावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

अनेक शेतकऱ्यांनी असाचं जुगाड करुन पैसे कमवायला हवे असं त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना त्यातून अधिकचा आर्थिक मोबादला सुध्दा मिळेल असंही त्यांनी सांगितले.

राज्यभरातले शेतकरी आता आपली पारंपारीक शेती करीत असताना त्यातून आपल्याला अधिक पैसे कसे कमावता येतील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या गोंष्टीचा अभ्यास सुध्दा करीत असल्याचे अनेक प्रकरणातून उघडकीस आले आहे. अनेक शेतकरी युट्यूबवरती काही गोष्टी पाहून शेती करीत आहेत. त्याचबरोबर चांगली शेती करण्यात त्यांना देखील यश आले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.