AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Namibia : दिल्लीतील खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाज! जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा दुसरा सामना दुबळ्या नामिबियाशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. असं असलं तरी कोणत्याही संघाला कमी समजून चालणार नाही. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. चला जाणून घेऊयात खेळपट्टीचा अंदाज..

India vs Namibia : दिल्लीतील खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाज! जाणून घ्या
India vs Namibia : दिल्लीतील खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाज! जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 11, 2026 | 8:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 18वा सामना भारत आणि नामिबिया या संघात होणार आहे. भारताचा हा दुसरा आणि नामिबियाचा पहिलाच सामना आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं असलं तरी टीम इंडियाची बाजू नामिबियाच्या तुलनेत भक्कम आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. असं असलं तरी नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण हा सामना संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी घेणं दोन्ही संघ पसंत करतील. त्यात ही खेळपट्टी कोणाला मदत करेल? असाही प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

खेळपट्टी कोणाला मदत करणार?

अरूण जेटली स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना पुरक आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर आरामात धावसंख्येचा पाठलाग करता येईल. कारण चेंडूला उसळी मिळते आणि आरामात बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करण्यासाठी सोपं जाईल. फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना थोडी फार मदत होऊ शकते. पण फलंदाजांना अधिक फायदेशीर असणार आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी तापमान 22 ते 16 अंश सेल्सिअस असू शकते. दव पडणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं थोडं कठीण जाईल.

भारत नामिबिया सामन्यात कोण वरचढ?

भारत आणि नामिबिया यांच्यात द्विपक्षीय मालिका वगैरे होत नाहीत. त्यामुळे आयसीसी स्पर्धेतच भिडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. हा सामना भारताने जिंकला आहे. टी20 वर्ल्डकप 2020 मध्ये हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 132 धावा केल्या होत्या. तर भारताने हे आव्हान 15.2 षटकात पूर्ण केलं होतं. आता जवळपास पाच वर्षांनी हे दोन संघ भिडणार आहे. असं असलं तरी भारत हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.