AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmadnagar : वादळी वाऱ्यामुळे घराचे छत उडाले, कांदा, गहू, फळबागांचं मोठं नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका काकडी,डांगरू पिकांना बसला असून अवकाळी पावसामुळे ढेमसच्या शेतीत पाणी साचल्यामुळे ढेमस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे.

Ahmadnagar : वादळी वाऱ्यामुळे घराचे छत उडाले, कांदा, गहू, फळबागांचं मोठं नुकसान
AhmadnagarImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 09, 2023 | 11:40 AM
Share

महाराष्ट्र : अहमदनगरला (Ahmadnagar) शेवगाव (shevgaon) तालुक्याच्या पश्चिम भागातील भातकुडगावसह भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, गुंफा परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झालय. अनेक ठिकाणी घराची छत उडून गेले आहे. तर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी नुकसानग्रस्त (Damaged) भागात पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याची सूचना दिल्या आहे. महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे काढणीला आलेली पीक काढत असताना धांदल उडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची…

अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यामध्ये सात तारखेला संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात वाडेगाव परिसरातील लिंबू,आंबा, कांदा, गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाळापूर तहसीलदार, ता. कृषी अधिकारी, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी,व कोतवाल यांनी मानकर यांनी आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विजांसह व गारांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेला नुकसानाची पाहणी केली असून या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यात 1 हजार 245 हेक्टर आर इतके शेतातील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.

शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका काकडी,डांगरू पिकांना बसला असून अवकाळी पावसामुळे ढेमसच्या शेतीत पाणी साचल्यामुळे ढेमस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळ बागायतदार उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ढेमसे, डांगरू, काकडी अशा फळायती शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......